पालघर येथे जमावाने साधूंच्या केलेल्या क्रूर हत्येचे व्हिडियोज व्हायरल झाले, आणि अख्या महाराष्ट्राची झोप उडाली. पालघर येथे दोन साधू एका आप्तेष्टाचा अंत्यसंस्कारासाठी जात असताना, पोलिसांनी त्यांना लॉकडाउनमुळे हायवे वरुन जाण्यास रोखले, त्यामुळे त्यांनी ग्रामीण रस्ता पकडला. मात्र या गावाकडच्या रस्त्यावर त्यांचा अत्यंत क्रूर असा मृत्यु लिहून ठेवला होता. जूना अखाड्यातील हे दोन साधू गुजरातला निघाले असताना पालघर येथे अफवाह पसरली की ते चोर आहेत. आणि केवळ या एका ‘संशयावरुन’ पोलिसांसमोर जमावाने त्यांना ठेचून ठेचून मारले. ही घटना अतिशय भीषण आहे. ७० वर्षांचे दोन निरागस साधू पोलिसांकडे मदत मागतात, त्यांचा हात घट्ट धरून ठेवतात कारण त्यांना भिती असते कि हा जमाव संशयावरुन त्यांना हानि पोहोचवेल. आणि पोलिस स्वत:च्या जीवाचे रक्षण करण्यासाठी या दोन बिचाऱ्या साधूंना राक्षस जमावाच्या स्वाधीन करतात? का म्हणून?
२. पोलिसांसमोर घटना घडत होती, या पोलिसांकडे पिस्तुल, काठ्या नव्हत्या का?
३. पोलिसांकडे त्यांच्या वरीष्ठांचे मोबाइल नंबर नव्हते का? बराच वेळ जमाव, साधूंना बेदम मारहाण करत असताना, पोलिसांनी काहीच का केलं नाही?
४. जमावाला बघून, परिस्थितीची तीव्रता बघून पोलिसांनी या साधूंना जमावासमोर बाहेर काढलेच का? त्यांना आतच का ठेवण्यात आले नाही?
५. राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर सामान्य जनतेने विश्वास कसा ठेवायचा? पुढे कधीही कुणीही राज्यातील पोलिसांकडे ‘आपले संरक्षणकर्ते’ अशा नजरेने का बघतील ?
या घटनेवर सरकारतर्फे ट्वीट, माहिती, ही व्हिडियोज व्हायरल झाल्यानंतर देण्यात आली. असे सांगण्यात येत आहे कि एकूण ११० आरोपींना अटक करण्यात आली आहे, मात्र हे बघून हिंदीतील एक म्हण आठवते ‘अब पछताए क्या होत, जब चिडिया चुग गई खेत’. अर्थात पोलिसांनी आता अटक जरी केली, न्याय जरी मिळवून दिला तरी त्या साधूंचा जीव त्याने परत येणार नाहीये. आणि ज्यावेळी पोलिस जीव वाचवू शकत होते, त्यावेळी त्यांनी या साधूंना जमावाला सुपूर्द करत त्यांच्या मृत्यूचा खेळ उघड्या डोळ्यांनी बघितला आहे, त्यामुळे आता सरकारने आणि राज्य पोलिसांनी कितीही आव आणून ‘आम्ही हे केलं, आम्ही ते केलं’ सांगण्याचा प्रयत्न जरी केला, तरी देखील त्यांच्यावर असलेला थोडाफार विश्वासही आता उडालेला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.